02/02/2025
**डॉ.भाऊसाहेब देशमुख व पत्रकारिता**
त्यावेळी ब्राह्मण व ब्राह्मणोत्तर असे दोन पक्ष होते. ब्राह्मणेत्तर पक्षाने म्हणावे तसे शेती व शेतकरी या समस्यांकडे विशेष लक्ष पुरवले नाही .शेती व शेतकरी यांच्या समस्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या डोक्यात थैमान घातले होते. बॅरिस्टर मोतीराम जी तिडके यांचे कडचे लग्न वर्धा इथे कांदे गावचे विश्वनाथ भुमरे यांच्या घराण्यात जमले या लग्न सोहळ्यात सारी मंडळी जमून याच लग्नाला शेतकरी अधिवेशनाचे स्वरूप दिले.
या अधिवेशनात भाऊसाहेबांनी शेतकरी वर्गाच्या विविध समस्या अधिवेशनापुढे मांडल्या त्या समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आपली संघटना असावी म्हणून या अधिवेशनाने **शेतकरी संघ*" हा नावाचा पक्ष स्थापन केला .शेतकरी संघ संपूर्ण विदर्भात गाजू लागला. त्याचवेळी वर्धा,चांदा, यवतमाळ, देवळी, वायगाव, रेवसा, इत्यादी ठिकाणच्या शेतकरी परिषदा चांगल्या गाजल्या. याशिवाय कुणबी परिषद ,अचलपूरची माळी, परिषद ,ब्राह्मणोत्तर परिषद, बेनोशाची वडर परिषद, शिंगणापूरची पारधी परिषद, या सर्व अधिवेशनाचे मार्गदर्शन व संचालन स्वतः डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केले. जणू काही सर्व मागासलेल्या जाती-जमातींच्या जागृतीचा विडा डॉ.पंजाबराव देशमुख यांनी उचलला होता. यात त्यांना निषिद्ध असे काहीच वाटले नव्हते. मागासलेल्या सर्व जाती एकाच वर्गात मोडतात असा त्यांचा समज होता. 1957 ला छत्तीसगड विभागातील धम्मतरी ला सामाजिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांना पाचरण करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन पुण्याचे भाऊ साहेबांना सामाजिक चळवळीचा झेंडा फडकविण्या साठी स्वतःच्या नियतकालिका ची निकडी ने आवश्यकता वाटू लागली. म्हणून अमरावतीला महिपत राव कुरकुरे यांच्या विदर्भ प्रेस मध्ये त्यांनी **महाराष्ट्र केसरी* नावाचे वृत्तपत्र सुरू केले. महाराष्ट्र केसरीच्या डोक्यावर **बहुजन सुखाय बहुजन हिताय** असे घोषवाक्य होते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या बहुजन समाजाचा अर्थ कष्टकरी समाज असाच होता. महाराष्ट्रात केसरी या नावाखाली छत्रपती शिवरायांचे चित्र होते. चित्रा खाली समता स्वातंत्र्य व बंधु प्रेम छापले होते. मुखपृष्ठाच्या पानावर **दृष्टीसमोर समता ठेवी स्वातंत्र धरी शिरी !
बंधुप्रेमा मागे लावी,
महाराष्ट्र केसरी !!
या कवितेत शेतकरी संघाच्या तत्त्वज्ञानाचे ध्येय निष्ठेचे सूत्र शब्दबद्ध करण्यात आले होते. महाराष्ट्र केसरीचे संपादक मोर्शी चे शामराव यादवराव गुंड होते. महाराष्ट्र केसरीचा संपादक अत्यंत व्यासंगी आणि सामाजिक क्रांतिकारक विचार प्रणालीचा पुरस्कार करणारा होता.अत्यंत प्रामाणिकपणे कोणाची भीड न ठेवता आणि जातीय
प्रतिक्रियावाद्यांची कोणतीही तमा न बाळगता महाराष्ट्र केसरी मध्ये क्रांतिकारक आणि स्फोटक लिखाण प्रसिद्ध होत असे. आर्मीचे दलपतसिंग चव्हाण यांचे महाराष्ट्र केसरी तील अभ्यासू लेख वाचकांना फार आवडत. त्यावेळचा अमरावती डिस्ट्रिक्ट कौन्सिल मध्ये गोसावी नावाचे लियासन ऑफिसर होते ते महाराष्ट्र केसरीच्या ऑफिसमध्ये खूप काम करत असत.
०१ ऑक्टोंबर १९४७रोजी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीला **संदेश** नावाचे साप्ताहिक सुरू केले. मध्य प्रांत वऱ्हाड चे राज्यपाल मा. मंगलदास पक्कासा यांच्या हस्ते श्री शिवाजी महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला.त्या समारंभ संदेशच्या शेकडो प्रति वाटण्यात आला. पहिल्याच अंकातील मुखपृष्ठावर सौ वत्सला वहिनीं चे आमदार बि. के. देशमुख यांना पत्र आले होते .वहिनींच्या या पत्राने साऱ्या विदर्भात संदेश चे नाव गाजले. अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या स्मृति निमित्य डॉ. पंजाबराव देशमुखांनी संदेश हे आवडीचे नाव नवीन वृत्तपत्राला दिले होते .अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या संदेश प्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुखांच्या संदेश चा विदर्भाच्या आठ जिल्ह्यात चार वर्ष दरारा होता. अच्युत बळवंतराव कोल्हटकर करांच्या दीदी तू रडतेस का बळवंतराव टिळक बाळंतीण झाले ,इत्यादी लेखा प्रमाणे संदेशच्या अग्रलेखांनी प्रति ग्राम यांचे धाबे दणाणले होते.
धातरवाड्याचे विष्णुपंत माणिकराव देशमुख संदेश चे संपादक होते. विर उत्तमराव मोहिते, ऍड रंगनाथ चौबळ मारुतराव तात्याजी ठाणेकर प्राचार्य एन सी देशमुख, प्राध्यापक शेंडे संपादक मंडळात होते. सौ .वनमाला अनिल कुमार व नागराचार्य या टोपण नावाखाली प्रसिद्ध झालेले लेख फार गाजले. महात्मा गांधी सदैव वैकुंठाला गेले आता तरी डोळे उघडा, वा महाराष्ट्र ,आता प्रायश्चिताचे ढोंग कशाला, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या मोटाराला ब्रेक नाही, हिम्मत असेल तर बसा, ना द्वारका प्रसाद मिश्रा जी नर्मदेच्या खाली तोंड खूपसू नका, दुखते कुठे सांगते कुठे, अमरावतीच्या जगदंबेच्या होत्युर लागलं, हिंग लेवे पपीता लेख सालम मिश्री लेव, लोकशाही आघाडीचा जाहीरनामा,अशा एक नाही शे शेकडो लेखांनी प्रती ग्रामी सोहळ्या जातीवाद्यांची संदेश ने भंबेरी उडून दिली पांढऱ्या कपनेतील काळी कारस्थाने, मातृभूमीचा मारवाडी रक्ताला लालचावला,आता कशाला उद्याची बात, बघ निघू नी चालली रात, संदेशच्या या लेखांनी राजकीय क्षेत्रात विक्रम करून सोडला होता. संदर्भ:- जागतिक कृषी क्रांतीचा विधाता लोकनेता डॉक्टर पंजाबराव देशमुख.